असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..............................
त्याचा जन्म झाला तेव्हा ते सगळे म्हणाले नक्कीच काहीतरी नाव कमवेल असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
पुढे अवघ्या 3-4 वर्ष मध्ये तो इतका बोलायचं की ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा नेता बनणार असं
त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
शाळेत जायला लागल्यावर घरी रोज न सांगता अभ्यासाला बसायचं,सगळ्या विषयात उत्तम मार्क्स मिळवायचा तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा Doctor बनणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
दहावीच्या वर्षात अभ्यासासोबतच प्रेम करायला लागला, जेव्हा हे समजलं तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच
पुढे जाऊन हा प्रेम विवाह करणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
पुढचं शिक्षण घ्यायला शहरामध्ये कॉलेजला जाऊ लागला, मित्रांच्या सोबतीतून घरी भांडण घेऊन यायला लागला सुजलेल्या थोबाडाकडे पाहून तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा गुंड बनणार असं त्याच्या
तोंडाकडे बघून वाटतंय..
शिक्षण सार संपवून जेव्हा नोकरीसाठी वण वण भटकून मोकळ्या हाताने घरी यायचा तेव्हा ते सगळे
म्हणायचे असाच बोंबलत बसला तर नक्कीच पुढे जाऊन बेरोजगार होणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय
..
बेरोजगारीवर मात देऊन कष्टाची सोबत घेऊन IT कंपनी मध्ये जॉब करत असतो ,प्रामाणिकपणा त्याचा पाहून
ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा मॅनेजर बनणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
कंपनी मधल्याच एका मुलीशी लग्न करून तो संसार त्याचा सुखाने सजवू लागतो, असच अचानक हसरा त्याचा चेहरा
पाहून ते सगळे म्हणायचे नक्कीच हा बाप बनणार आहे असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
नोकरीतील उच्च पदाचा फायदा आणि त्याची मेहनत त्याला परदेशात नोकरीसाठी संधी देते, तो ही बायको
मुलांसोबत तिकडे जायला तयार होतो तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच हा आई बापाला वृद्धश्रमात टाकणार
आहे असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
एवढं सगळं घडत असताना त्याचे जीवन तो आंनदाने जगतच असतो, ते सगळे असतातच त्याच्या चांगल्या
वाईटावर फक्त बोलणारे, फुकटचे उपदेश देणारे पण तो मात्र जात राहतो पुढे पुढे या सगळ्यांशी कानाडोळा करत.ते सगळे काय म्हणतील याचा विचार न करता ! चांगलं झालं तरी ते सगळे बोलणारच आणि वाईट झालं तरी ते सगळे बोलणारच!!
मिळालेले आयुष्य समाधानाने जगून शेवटी तो या नश्वर दुनियेचा निरोप घेतो,देहापासून जरी त्याचा आत्मा त्याला सोडून गेला होता तरी समाधानी चेहऱ्याकडे पाहून ते सगळे म्हणायचे झोपेतून हा उभा राहील असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..
म्हणून एखादी गोष्ट करताना कुणी काय म्हणेल याचा जास्त विचार न करता ती गोष्ट कशाप्रकारे जास्त चांगली होऊ शकेल याचा विचार करावा कारण ,ते सगळे तुम्हाला नेहमीच भेटतील तुमच्या आसपास जे फक्त बोलणार्यांची भूमिका बजावत असतात !!!
- मोहनिश महंमद खुंटे.
12-12-2016