रविवार, १५ मे, २०१६

यावी अशी संकटे

आता फक्त एक उणीव भासत आहे
गार हवेच्या झुळुकेची...
अंतरातील उष्म निखारे 
शरिर जाळण्यापुर्विच शांत करण्यासाठी...

आलच तर एखाद तुफानी वादळ सुद्धा याव..
द्वेष,मत्सर,अहंकार,अगदीच मुळापासून उपटून टाकण्यासाठी..
मग असच रात्री एखाद शितल चांदण पडाव..
प्रेम ,सहकार्य ,आदर यांना कुशीमध्ये घेण्यासाठी..

मधून मधून असा भयंकर दुष्काळ पडावा..
छावणीवर का होईना आपली माणस जवळ येण्यासाठी..
त्सुनामीच तुफान सुद्धा याव..
सातासुमुद्रा पलीकडच्या आपल्या लोकांना पुन्हा आपल्यात आणण्यासाठी..

विचित्र देहांमध्ये असा भयंकर वणवा पेटावा,
वासनेची भूक करपून टाकण्यासाठी..
स्वाती नक्षत्राचा पाऊस देखील पडावा,
 जिव्हाळ्याचे मोती बनण्यासाठी..

व्हावी कधी गारपीट भरकटलेल्या 
मानवाला मायेची जाणीव होण्यासाठी,
पहाटेच सगळीकडे दव देखील पसराव..
मित्रत्वाच्या कळ्यांना उमलण्यासाठी..


मी तर म्हणतो यावी अशी अनेक संकटे मानवी जीवनात 
माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी..
" चमत्काराची " कधी गरजच पडू नये माणसातील देव पाहण्यासाठी....
माणसातील देव पाहण्यासाठी !!!!


- मोहनिश महंमद खुंटे.
(१७/०४/२०१६)

२२ टिप्पण्या:

  1. Unbelievable always u write something something which .
    Helps to think about it...


    Keep moving on bro...

    -Arjun

    उत्तर द्याहटवा
  2. Kharch Vichar karayla lavtat re tuzya kavita.......great work bhava... 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. Kharch Vichar karayla lavtat re tuzya kavita.......great work bhava... 👌👌👌

    उत्तर द्याहटवा